26 January Bhashan Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण 26 जानेवारी मराठी भाषण 26 january speech in marathi म्हणजेच प्रजासत्ताक दिनावर भाषण बघणार आहोत, 26 जानेवारी मराठी भाषण या भाषणाचा वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये याचा उपयोग करू शकतात. तसेच हे 26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी सुद्धा उपयोगी आहे चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरवात करूया.
26 january speech in marathi
“26 जनवरी” म्हणजेच भारतात गणतंत्र दिनानिमित्त आणि संविधान स्थापनेची आठवडे. हे दिवस देशभरात उत्साहाने आणि गर्वाने साजरा केले जाते. इतिहासात, २६ जानेवारी १९५० मध्ये भारताचं संविधान स्वीकृत झालं आणि त्याचं प्रभाव होऊन भारत संघाचं राजकीय प्रणाली गणतंत्र बनलं.
गणतंत्र दिनाच्या अग्रदूत समारंभांमध्ये, नवी दिल्लीत एक विशाल परेड साजरा केला जातो, ज्यात देशाचं सैन्यिक शक्ती, सांस्कृतिक विविधता, आणि सजवा किंवा साधनांचं प्रदर्शन केलं जातं. भारताचं राष्ट्रपती राष्ट्रध्वज राष्ट्रपति भवनात फेरी घेतल्याने राष्ट्रध्वज सुरू तर होतं. या समारंभांत उच्चप्रमाणात्मक आणि विभिन्न क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशभरात गणतंत्र दिन साजरा केला जातो.
२६ जानेवारी भाषण मराठी 2024
मित्रांनो, आपले स्वागत आहे!
अध्यक्ष मोहदय, आदरणीय शिक्षक गण, व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले विद्यार्थी मित्र आणि स्वतंत्र देशाचे नागरिक हो….मी आज तुमच्यासमोर प्रजसत्ताक दिनानिमित्त गणतंत्र दिनानिमित्त दोन शब्द बोलण्यासाठी उभा आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन हा आपला स्वतंत्र भारत, प्रजेच्या सत्तेत आहे. लोक राज्यात, म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हे सर्वाना सांगण्यासाठी 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अमलात आले. खरेतर भारताचे संविधान, संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या घटनेची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडला गेला. 26 जानेवारी 1950 पासून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
अनेक लढे आंदोलने केल्या नंतर तब्बल दीडशे वर्षानंतर भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. यात भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी सशस्त्र लढे दिले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात महात्मा गांधीनी दिलेल्या अहिंसा पद्धतीचा लढ्याचा आंदोलनाचा खूप मोठा वाटा होता.
स्वतंत्र भारताला संविधान नव्हते. संविधान निर्माण कारण्यासाठी 28 आँगस्त 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली यात जे सदस्य होते ते भारतातल्या राज्यामधील निर्वाचित सदस्यामधून निवडण्यात आले होते. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद ई प्रमुख सदस्य होते. या संविधान समितीचा सदस्यांनी मिळून 2 वर्षे 11 महिने 18 दिवसामधून 114 दिवस काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्माण करण्यात महत्वाचे योगदान होते. म्हणून त्यांना संविधानाचे निर्माते देखील म्हणतात. संविधान लागू होईपर्यंत भारतात भारतीय राज्यशासनाच्या 1935 चा कलमावर कायदे आधारित होते.
26 जानेवारीला दरवर्षी भारतात प्रजासत्ताक दिना निमित्त उत्सव साजरा केला जातो भारताची राजधानी येथे खूप मोठे संचलन आयोजित केले जाते. राष्ट्रपतींचा हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे पुरस्कार देण्यात येतात. कामाचा गौरव करण्यासाठी. प्रजासत्ताक दिनाचा सुरवातीपासूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण देण्याची प्रथा आहे. 2017 साली संयुक्त अरब समितीचे राजपुत्र शेख मोहोम्म्द बिन झायदे अल नाह्यान यांना निमंत्रण होते.
हा राष्ट्रीय दिवस मोठ्यांप्रमाणेच लहान चिमुकल्यांना खर्या अर्थाने उत्सव आहे. या दिवशी त्यांना खाऊ वाटप केला जातो. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत. आपण भारतात कुठेही राहू शकतो, फिरू शकतो, व्यवसाय करू शकतो. आपल्याला स्वतःचे विचार, मत माडण्याचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याची जाण आपण ठेवली पाहिजे. या स्वातंत्र्याचा वापर आपण देशहितासाठी आपण केला पाहिजे. शांतता, समता, बंधुता ही मुल्ये आपण जोपासली पाहिजेत. भारतीय राज्यघटनेचा स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच. शेवटी कवितेचा दोन ओळी सादर करतो
हम जिस आझादी मे जी रहे है|
उस आझादी को वीरोने अपने लहू से लिखा था|
Kalnirnay Marathi Calendar 2024 | कालनिर्णय कैलेंडर 2024 | Kalnirnay 2024